Search More Kavita, Katha, Charolya..

Marathi Jokes,Jokes in Marathi

Marathi Jokes,Jokes in Marathi


आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणुन
मी तिला काल घरी घेऊन
आलो आणि जोडीने
आईच्या पाया पडलो...
आई रागाने म्हणाली,
"मेल्या पोरगी कोणाची..??"
मग मी बोललो,
"पोरगी लोकाची पण आयटम
तुझ्या लेकाची...!!"

Marathi Jokes

Jokes in Marathi


मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले....
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव..
.
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले.

Marathi Jokes

New Marathi Jokes


एका मूलाचे लग्न जमले...!
.
मुलगी खुपच सुंदर होती...
.
.
दोघेजण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत
असत......
.
.
मग त्यांचे लग्न झाले.
आणि शेवटी ती मंगलमय रात्र
आली.....
.
.
त्या रात्री मूलगा तीचा घुंगट उचलून
म्हणाला, " तु
खरंच
खुप सुंदर आहेस.... बोल तुला काय गिफ्ट देऊ.?"
.
.
मुलगी लाजत लाजत म्हणाली.
" पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया."
.
.
तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे
होते.
.
.
बघा whatsapp चा तोटा.
" जा आता दम्मू ततमीर ला "…

Marathi Jokes

Marathi Jokes 



चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर
चॅटिंग
करताना.....
चिंगी : हाय हॅण्ड सम,
.
.
अनोळखी व्यक्ती : हाय,
.
.
चिंगी : मस्त प्रो.पिक आहे, छान दिसतोस,
एकदम रापचिक,
शर्ट कुठे घेतलास ???
.
.
अनोळखी व्यक्ती : बाजारातून,
.
.
चिंगी : तू काय करतोस ?
.
.
अनोळखी व्यक्ती :
मी आंध्रा बँकेत
काम करतो,
.
.
चिंगी : हो का, मस्त,
माझे बाबा पण
त्याच बँकेत काम करतात,
.
.
अनोळखी व्यक्ती : काय नाव त्यांचे ?
.
.
चिंगी : विजय कावळे,
.
.
अनोळखी व्यक्ती ( विजय कावळे) :
कार्टे, क्लासला जातेस म्हणून गेलीस
ना ?
इथे काय करतेय, घरी ये, बघतोच तुझ्याकडे…

Marathi Thoughts (मराठी सुविचार)

Marathi Thoughts (मराठी सुविचार) 


Jivanacha Arath Samjun Ghenyasathi 
mage walun Paha panrantu Pratakshyat 
Jivan Matar Pudhe Pahun Jaga

संगतीचा परिणाम (Marathi Bodh Katha)

संगतीचा परिणाम  



एका गावाबाहेर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्या झाडाला खूप चिंचा लागत असत. त्या झाडाची सावली वाटसरुंना गारवा देत असे. ते झाड इतके विचारी होते की आपल्या पिकलेल्या चिंचा ते स्वत: होवून खाली पाडून टाकत असे. वाटसरू अशा चिंचा घेवून जात. त्यातील कांही चिंचोके कुठे ना कुठे, कधी ना कधी रुजत असत, उगवत असत आणि त्यातील कांहीचे मोठे झाडही होत असे. जिनेटिक गुणांमुळे या नवीन उगवणा-या झाडांचा माइंडसेटही त्या गावाबाहेरच्या चिंचेच्या झाडासारखाच परोपकारी, सात्विक, पॉसिटिव्ह थिंकिंग करणारा असे.

पण संगतीच्या परिणामामुळे एखाद्याचे चांगले मूळ गुण कसे मार खातात त्याची ही कथा आहे.

एके दिवशी एका कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.'

'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'.

हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'.

चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे.

एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले.

आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'.

आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले. मेले.

आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले.

अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....

अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास ..... 


तुकुतुकू ग्रहावरून आलेल्या त्या एलियनने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचे ठरवले होते. त्याने आता पुण्याकडे आपला मोर्चा वळवला. एका अमेरिकन इतिहास संशोधकाच्या रुपात तो पुण्यात अवतरला. इतिहासाची आवड असणा-या कांही टिपिकल पुणेरी लोकांशी त्याने मैत्री केली. त्याने मित्र निवडताना ज्यांच्या चेह-यावर प्रचंड तुच्छताभाव दिसत होता असेच नमुने निवडले. असे करण्याचे कारण म्हणजे त्याच्या तुकुतुकू ग्रहावर या प्रकारचे स्वत:ला फारच शहाणे समजणारे लोक होते, त्यांच्याशी यांचे काय साधर्म्य आहे हे त्या एलीयनला बघायचे होते. अर्थातच असे मित्र गोळा करायला त्याला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

एके दिवशी त्याचा एक पुणेरी मित्र आपली नसलेली छाती फुगवत त्याला म्हणाला, "तुमच्या अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास आहे, पण आमच्या भारताला 5000 वर्षांचा इतिहास आहे". हे ऐकताच तो एलियन म्हणाला, "हो, आणि तुमच्या महाराष्ट्राला तर फक्त साडे तीनशे वर्षांचाच इतिहास आहे".

एलियनचे हे मत ऐकल्यावर त्या पुणेकराची छाती एकदम आतच गेली. मग तो एलियन म्हणाला, 'अरे मित्रा, तुला तुझ्या महाराष्ट्राचा 350 वर्षापूर्वीचा इतिहास माहीत नाही, मग अमेरिकेचा 500 वर्षांपूर्वीचा इतिहास कसा काय माहीत असणार? तुझे अज्ञान मी समजू शकतो. अरे, तू जेंव्हा अमेरिकेला 500 वर्षांचाच इतिहास आहे असे म्हणतोस, त्यावेळी तुला युरोपिअन लोक अमेरिकेत गेले आणि तेथे वसले एवढेच माहीत असते. पण त्या अगोदरही तेथे लोक होते आणि त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तू विसरतोस. तुझ्यासारख्या बुद्धिमान टोळीचा वारसा असलेल्या माणसाला हे अज्ञान शोभत नाही".

हे ऐकताच तो पुणेकर तरातरा निघून गेला. पुढे तो एका इतिहास विध्वंसक मंडळात त्या एलियनला दिसला होता. एका कर्नाटकी माणसाला म्हणत होता, "आमच्या महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल या दोन्ही गोष्टी आहेत, तुमच्या कर्नाटकाला फक्त भूगोलच आहे".

एलियनची आता पक्की खात्री झाली की हे टिपिकल पुणेकर कधीच सुधरू शकत नाहीत. तुकुतुकू ग्रहावरील त्या रानटी गो-या टोळ्यांशी यांचे फारच साम्य आहे हे त्याला आता कळून चुकले होते.

पाणी गढूळ करणारा कोळी - Marathi Bodh katha


पाणी गढूळ करणारा कोळी - Marathi Bodh katha



एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.

मराठी विनोद

मराठी विनोद


असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’



शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!




एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!


मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."
"माहीत नाहीत सर."
दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!


आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, "हे पहा, तुमच्या कविता आम्हाला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,"
"नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार," नारायण सुर्वे म्हणाले. "पण ही कविता तुम्ही शिकविली तर’
‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल आणि शून्य मार्क मिळतील तुला," नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!



राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.

कुळकथा गव्हाचे पीक

कुळकथा गव्हाचे पीक | Wheat Crops Details


जगातील बहुतेक देशांमध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. निसर्गत:च ज्या पिकांमध्ये संकर होतो त्यात गहू आहे. असा संकर होताना जुन्या वाणातले अवगुण सोडून देऊन गुण मात्र कायम ठेवण्याचा गुणधर्म या पिकाने दाखवला आहे. 
शवृद्धी आणि वंशसातत्य या दोन प्रक्रिया हाच प्रत्येक सजीवाच्या जगण्याचा मूळ हेतू. त्याचबरोबर सजीवाची प्रत्येक जाती आपलं वेगळंपण टिकवून ठेवण्यासाठी वर्णसंकर टाळतातच. म्हणूनच निसर्गत: संकर फारच क्वचित घडतो. वाघ आणि सिंह दोन्ही एकाच प्रजातीचे. मात्र, निसर्गत: या दोन जातींच्या प्राण्यात संकर घडत नाही. माणसानं नसती उठाठेव केली आणि या दोन प्राण्यांचा संकर घडवून आणला.


यांच्या संकरातून अस्तित्वात आलेला प्राणी. पण, हा प्राणी वंध्य आहे. तो पुढची पिढी तयार करू शकत नाही. 'संकर कुळाच्या नाशास कारणीभूत ठरतो,' असं भगवान श्रीकृष्णांनी 'गीते'त सांगितलं आहे. याचं पालन सर्वच प्राणी आणि वनस्पती करतात. काही वनस्पती तर इतक्या 'सोवळ्या', की स्वत:च्याच जातीच्या दुसर्‍या फुलातून येणारे पराग त्यांना फलन क्रियेसाठी चालत नाहीत. त्यामुळे आपला वंश त्या शंभर टक्के शुद्ध राखतात. गोकर्ण, वाटाणा या वनस्पतींनी आपला शुद्ध वंश अनेक पिढय़ा टिकवला आहे. याचाच आधार घेऊन ग्रेगर मेंडेलने १८६५मध्ये प्रयोग केले आणि अनुवंशशास्त्राचा पाया घातला. 'केना' ही पावसाळ्यात उगवणारी एक वनस्पती. हिच्या जमिनीवरील फांद्यांवर निळ्या रंगाची, फुलपाखरासारखी दिसणारी फुलं येतात. त्याखेरीज जमिनीखाली पांढर्‍या रंगाची, न उमलणारी मुग्धपुष्पेही असतात. अर्थात, या फुलांचं फक्त स्वपरागणच शक्य आहे. जात व वंश शुद्ध राखण्याचा एक अजब मार्ग. 
'मी जात टाकली' असं गाणं म्हणणार्‍याही काही वनस्पती आहेत. मात्र, ही 'बंडखोरी' त्यांनी 'बंड करायचं' म्हणून केलेली नाही; तर निसर्गत:च या 'चुका' घडल्या आणि नवीन जाती अस्तित्वात आल्या. निसर्गाच्या या 'चुका' माणसाच्या फारच फायद्याच्या ठरल्या. आज आपण सर्रास वापरत असलेला गहू हे अशा दोन चुकांचं अपत्य आहे. दोन वेळा निसर्गातच आंतरजातीय संकर घडून आजचा गहू जन्मला. त्याने आपल्या पूर्वजांचे 'चांगले', अर्थातच माणसाच्या दृष्टीने गुण स्वीकारले. खरं म्हणजे माणसाला नको असलेले, पूर्वजांचे गुण मोडीत काढले.
गव्हाची पहिली लागवड सुरू झाली, ती भूमध्य समुद्राच्या प्रदेशात. हा गहू फार विचित्र वृत्तीचा म्हणजे तयार झालेले दाणे तुर्‍यापासून आपोआप विलग होत आणि अक्षरश: विखुरले जात. ते गोळा करणं म्हणजे शिक्षाच. म्हणूनच 'अँडॅम आणि ईव्ह'ला या गव्हापासून Bread म्हणजे पाव तयार करण्याची आज्ञा ईश्‍वराने दिली असावी. अशा प्रकारचा गहू आजही तुर्कस्तान आणि युगोस्लाव्हियाच्या काही भागात लागवडीखाली आहे.
साधारणत: इ. स. पूर्व आठव्या शतकात या गव्हाचा एका गवताशी 'गोट ग्रास'शी संकर घडून आला. या संकरित गव्हात आपोआप विखुरण्याचा गुणधर्म नव्हता, हे बरं झालं. मूळ गव्हात आणखी एक वैगुण्य होतं. आंबवून पाव तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी गहू भाजावा लागे. मग तो कांडत आणि पीठ तयार करत. या क्रियेत विशेषत: भाजण्यामुळे गव्हातील प्रथिने एकत्र गोळा होत आणि आंबण्याच्या क्रियेत तयार होणार्‍या कार्बनडायऑक्साईडचे बाहेर पडण्याचे रस्ते बंद होत. परिणामी, हा पाव फुगत नसे. आजही हा भूमध्य प्रदेश, मध्य रशिया, फार काय भारतातही काही भागांत लागवडीखाली आहे. याचे दाणे जड असतात आणि ही जात ं१्रं'>ं१ ि६ँीं३ /ं१्रं'>किंवा ं१्रं'>टूं१ल्ल्र ६ँीं३ /ं१्रं'>म्हणून ओळखली जाते. आपण याला 'खपली गहू' म्हणतो. रवा, शेवया, नूडल्स करण्यासाठी हा गहू वापरला जातो.
यानंतर 'खपली' गव्हानं पुन्हा नवा 'घरोबा' केला. आणखी एक संकर. यातून आपण आज वापरत असलेला ं१्रं'>रा३ ६ँीं३ /ं१्रं'>अस्तित्वात आला. याचं पीठ करण्यासाठी त्याला भाजावं लागत नाही. त्यामुळे याच्या पिठातील ग्लायडिन आणि ग्लुटेनिन ही दोन प्रथिनं भिजवलेल्या कणकेतील ताणाला जबाबदार राहतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत या प्रथिनांतून कार्बनडायऑक्साईड सहज बाहेर पडू शकतो आणि पाव फुगून टम्म होतो.
गव्हातले हे बदल त्याची जातिव्यवस्था बदलण्यामुळे झाले. हे सर्व बदल नैसर्गिकरीत्या झाले. चाणाक्ष माणसाने ते शोधले आणि स्वत:साठी त्याचा वापर केला. 

जरा निवांत...मराठी जोक्स

 जरा निवांत...मराठी जोक्स

तीन मालवणी उंदीर गप्पा मारीत बसलेले असतात
पयलो उंदीर - माका विषारी गोळिंयेंचो काय येक फरक पडना नाय, मी विषारी गोळीये आरामात चघळतय.
दुसरो उंदीर - मी पिंजर्‍यातलो पनीर आरामात खाऊन बाहेर येतय.
तिसरो उंदीर उठता आणि चलत र्‍हवता...
पहिलो आणि दुसरो उंदीर दोगय तेका इचारतात, अरे मेल्या, काय झाला...? खय चललंस...?
तिसरो उंदीर म्हणता, वायच गपच र्‍हव, इलय मांजरीचो मुको घेऊन...!!


नवे उखाणे

 नवे उखाणे


- गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,
- - - नाव घेते सोडा माझी वाट.



- लग्नात लागतात हार आणि तुरे,
- - - चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

आखूड शिंगी, लांब मान्या

आखूड शिंगी, लांब मान्या


'अभिताभ बच्चन' म्हणजे लांब मान्या, लंबू टांग जिराफ. मोकळा फिरताना सारखी मान वेळावत कुठे तरी दूरवर न्याहळत असतो. त्याचे कुतूहलपूर्वक पाहणारे डोळे जमिनीपासून ५ ते ६ मीटर उंचीवरून परिसराचा वेध घेतात. मान चारही दिशांना फिरते. त्यामुळे त्याच्या दृश्य क्षेत्राचा विस्तार खूपच मोठा असतो. त्याची उंची भरते ५ ते ६ मीटर. नर जास्त उंच असतात. नराचं वजन सुमारे २000 किलो आणि मादीचं १000 किलोपर्यंत असतं. मान सोडून उरलं शरीर आखूड असतं. जिराफाची श्रवणक्षमता खूप असते. त्याचप्रमाणे घ्राणेंद्रियंही संवेदनक्षम असतात. जिराफाला दीर्घ काळ नाकपुड्या बंद करता येतात. त्यामुळे गरम वाळूची वादळं आणि मुंग्यांसारखे उपद्रवी कीटक यांच्यापासून रक्षण करता येतं. जीभ खूप लांब असते. ती उंच काटेरी फांद्यांवरचा पाला खाताना छोट्या फांद्यांना विळखा घालू शकते. नाक साफ करायला तिचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अंग स्वच्छ करायलाही ती उपयोगी पडते. जिभेचा रंग गर्द तपकिरी काळपट असतो. त्यामुळे सूर्य तपासून तिचं रक्षण होऊ शकतं.
जिभेप्रमाणेच वरचा ओठ थोडा लांब व खूप लवचिक असल्याने तो पाला तोडायला मदत करतो. शिवाय, जिभेवर, ओठात आणि तोंडाच्या त्वचेवर निबर उंचवटे असतात. त्यामुळे झाडांच्या टोकदार काट्यांपासून संरक्षण मिळतं.
मोठाले नारिंगी, तपकिरी किंवा काळपट ठिपके आणि त्याभोवतालचे फिके पिवळे आणि पांढरे मऊ केस यांमुळे जिराफ खूप आकर्षक दिसतो. ठिपक्यांखालच्या त्वचेत रक्तवाहिन्यांचं दाट जाळं असतं. त्यामुळे शारीरिक तापमान संतुलित ठेवता येतं. मोठय़ा धर्मग्रंथीही त्यासाठी मदत करतात. अंगाच्या विशिष्ट तीव्र वासामुळे कृमिकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्वचेतून एकूण अकरा रासायनिक द्रव स्रवतात. त्यात इंडोल व इ-मेथिलींडोल यांचा मोठा भाग असतो. नरांचा शरीरगंध जास्त तीव्र असतो. लैंगिक मिलनासाठी तो आकर्षक ठरतो. जिराफाचं शेपूट साधारण एक मीटर लांब असते. त्यामुळे माश्यांसारखे उपद्रवी कीटक मारता येतात. डोक्यावर दोन आखूड शिंगं असतात. लढाईसाठी लांब मांसल दणकट मान खूप उपयोगी पडते. झुंजीत मानेचा जोरदार रेटा महत्त्वाचा ठरतो. त्यात कधी मान दुखावतेसुद्धा. मृत्यूही ओढवतो.
लांबलचक पायांचा उपयोग झेपा घेत वेगाने पळण्यासाठी होतो. पळताना मागचे पाय पुढच्या पायांपुढे आधी टेकतात. मग पुढचे पाय जागा सोडतात. त्या वेळी तोल सांभाळायला लांब मानेचे लयीतले झोके उपयोगी पडतात. धावताना वेग एका क्षणात वाढवता येतो. तासाला साठ कि. मी. अशी गती पकडता येते. घोड्यांप्रमाणेच जिराफ उभ्यानेच झोपू शकतो; पण जमिनीवर लोळण घेऊन तो ४-६ तास झोप काढतो. पाणी पिण्यासाठी त्याला पाणवठय़ाजवळ पाय फाकून, मान वाकवून पाणी प्यावं लागतं. मानेची लांबी दोन मीटर असली, तरी मणक्यांची संख्या आठच असते. मात्र, प्रत्येकाची लांबी सुमारे २८ सेंटिमीटरपर्यंत भरते. मानेची लांबी वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. मानेसाठी जिराफाला जादाचा आठवा मणकाही लाभलाय.
मान वाकवली, की डोक्यातला रक्तदाब वाढू नये आणि एरवी उंचीवरच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा व्हावा, अशी झडपांची व्यवस्था हे जिराफाचं वैशिष्ट्य आहे. हृदयाचे स्नायूही खूप बळकट असतात. त्यामुळेच लांब मान्या, लंबू टांग जिराफाचा पळतानाही निभाव लागतो. रक्तदाबाचं नियंत्रण होतं.

प्यार का दिन 14 फरवरी Valentines Day History 14 February

 प्यार का दिन 14 फरवरी

History of Valentines Day

 

प्यार का दिन, प्यार के इजहार का दिन। अपने जज्बातों को शब्दों में बयां करने के लिए इस दिन का हर धड़कते हुए दिल को बेसब्री से इंतजार होता है। जी हां, हम बात कर रहे हैं, प्यार के परवानों के दिन की, वेलेंटाइन-डे की...। प्यार भरा यह दिन खुशियों का प्रतीक माना जाता है और हर प्यार करने वाले शख्स के लिए अलग ही अहमियत रखता है। 

14 फरवरी को मनाया जाने वाला यह दिन विभिन्न देशों में अलग-अलग तरह से और अलग-अलग विश्वास के साथ मनाया जाता है। पश्चिमी देशों में तो इस दिन की रौनक अपने शबाब पर ही होती है, मगर पूर्वी देशों में भी इस दिन को मनाने का अपना-अपना अंदाज होता है।

जहां चीन में यह दिन 'नाइट्स ऑफ सेवेन्स' प्यार में डूबे दिलों के लिए खास होता है, वहीं जापान व कोरिया में इस पर्व को 'वाइट डे' का नाम से जाना जाता है। इतना ही नहीं, इन देशों में इस दिन से पूरे एक महीने तक लोग अपने प्यार का इजहार करते हैं और एक-दूसरे को तोहफे व फूल देकर अपनी भावनाओं का इजहार करते हैं। 

 इस पर्व पर पश्चिमी देशों में पारंपरिक रूप से इस पर्व को मनाने के लिए 'वेलेंटाइन-डे' नाम से प्रेम-पत्रों का आदान प्रदान तो किया जाता है ही, साथ में दिल, क्यूपिड, फूलों आदि प्रेम के चिन्हों को उपहार स्वरूप देकर अपनी भावनाओं को भी इजहार किया जाता है। 19वीं सदीं में अमेरिका ने इस दिन पर अधिकारिक तौर पर अवकाश घोषित कर दिया था। 
यू.एस ग्रीटिंग कार्ड के अनुमान के अनुसार पूरे विश्व में प्रति वर्ष करीब एक बिलियन वेलेंटाइन्स एक-दूसरे को कार्ड भेजते हैं, जो क्रिसमस के बाद दूसरे स्थान सबसे अधिक कार्ड के विक्रय वाला पर्व माना जाता है।

प्यार दुनिया का सबसे खूबसूरत अहसास है Stories of Valentines Day in Hindi

 Stories of Valentines Day in Hindi

प्यार दुनिया का सबसे खूबसूरत अहसास है


प्यार दुनिया का सबसे खूबसूरत अहसास है। जब यह अहसास सुखद है, सुंदर है, सलोना है तो क्यों इसके नाम पर सदियों से खून बहता रहा है? कभी जात-पांत के नाम पर कभी मान-सम्मान और तथाकथित प्रतिष्ठा के नाम पर। कभी अमीरी-गरीबी के अंतर के नाम पर। 
पर यहां मुद्दा ही दूसरा है। प्यार को छलने वाला समाज तो अत्याचार करने को तैयार बैठा ही है। कभी किसी सेना(?) के रूप में। कभी किसी धर्म-संस्कृति (?)के ठेकेदार के रूप में। लेकिन इससे पहले कि वे अपना कुत्सित रूप समाज के सामने प्रदर्शित करें स्वयं प्रेमियों ने अपने लिए समस्या खड़ी कर ली है।

वे एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां उन्हें स्वयं नहीं पता कि जो उन्हें हुआ है वह प्यार है भी या नहीं? प्यार की शुद्धता और सहजता से अनजान आज के प्रेमी इस सवाल से जूझ रहे हैं कि कोई तो आए और उन्हें यह बताए कि 'हां, यही प्यार है।'

आज प्यार की सरलता कायम नहीं रही। उसकी गहराई में अंतर आया है। अगर ऐसा नहीं होता तो क्यों टूटकर बिखरता वह किरचों-किरचों में? तो क्या जो टूटता है वह प्यार होता ही नहीं है? मनोविज्ञान कहता है प्यार तो मन में एक बार बसी छवि की ऐसी अनुभूति है जो शाश्वत होती है। समय के चिह्न भी फिर जिस पर दिखाई नहीं देते हैं। 
यहां तक कि दैहिक परिवर्तन भी नहीं। प्यार यदि सचमुच प्यार ही है तो समय बीतने के साथ उसका रंग गहराता ही है, धूमिल नहीं होता। लंबे समय तक साथ रहने के बाद एक-दूसरे को देखा नहीं जाता बल्कि अनुभूत किया जाता है, ह्रदय की अनंत गहराइयों में। जो लोग अपनी सच्ची अंतरंगता के साथ एक-दूसरे के साथ रहते हैं, वे एक-दूसरे में अंशत: समाहित हो जाते हैं।

कुछ इस तरह कि 60 वर्ष पहले प्रेम-विवाह करने वाले एक प्रेमी कहते हैं - 'मैं वही सोचता हूं जो 'वह' कहती है या जो मैं सोचता हूं वही 'वह' कहती है। बड़ी मीठी उलझन है। कई बार तो ऐसा लगता है मानो मैंने अपने ही शब्द उसके मुंह में डाल दिए हैं।'

और 'प्रेमिका' कहती है - 'हम हर काम का श्रेय एक-दूजे को देते हैं। हम एक-दूजे की छवि को बनाए रखने के लिए दीवानों की तरह काम करते हैं। जैसे 'इनके' नाम से मैं दूसरों को उपहार भेजती हूँ और मेरी तरफ से 'ये' दूसरों से क्षमा मांग लिया करते हैं। '

यानी एक के शुरू किए गए वाक्य को जब दूसरा पूरा करता है। दूर-दूर बैठकर भी दृष्टि ऐसी होती है जिसका अर्थ स्पष्ट करने की जरूरत नहीं होती। या किसी भी मनोरंजन के विषय में उनके मनोभावों को व्याख्या की आवश्यकता नहीं पड़ती। तब यही प्यार का वह वटवृक्ष होता है जिसकी छांव तले प्यार के नन्हे पौधे जीवन-रस पाते हैं। 

झरने का पानी (Hindi Bodh Katha,Moral Stories in Hindi)

 झरने का पानी

महात्मा बुद्ध एक बार अपने शिष्य आनंद के साथ कहीं जा रहे थे। वन में काफी चलने के बाद दोपहर में एक वृक्ष तले विश्राम को रुके और उन्हें प्यास लगी।

आनंद पास स्थित पहाड़ी झरने पर पानी लेने गया, लेकिन झरने से अभी-अभी कुछ पशु दौड़कर निकले थे जिससे उसका पानी गंदा हो गया था। पशुओं की भाग-दौड़ से झरने के पानी में कीचड़ ही कीचड़ और सड़े पत्ते बाहर उभरकर आ गए थे। गंदा पानी देख आनंद पानी बिना लिए लौट आया।

उसने बुद्ध से कहा कि झरने का पानी निर्मल नहीं है, मैं पीछे लौटकर नदी से पानी ले आता हूं। लेकिन नदी बहुत दूर थी तो बुद्ध ने उसे झरने का पानी ही लाने को वापस लौटा दिया।

आनंद थोड़ी देर में फिर खाली लौट आया। पानी अब भी गंदा था पर बुद्ध ने उसे इस बार भी वापस लौटा दिया। कुछ देर बार जब तीसरी बार आनंद झरने पर पहुंचा, तो देखकर चकित हो गया। झरना अब बिलकुल निर्मल और शांत हो गया था, कीचड़ बैठ गया था और जल बिलकुल निर्मल हो गया था।

महात्मा बुद्ध ने उसे समझाया कि यही स्थिति हमारे मन की भी है। जीवन की दौड़-भाग मन को भी विक्षुब्ध कर देती है, मथ देती है। पर कोई यदि शांति और धीरज से उसे बैठा देखता है रहे, तो कीचड़ अपने आप नीचे बैठ जाता है और सहज निर्मलता का आगमन हो जाता है।

Happy Valentines Day 2014 Sms in Bengali

 Happy Valentines Day 2014 Sms in Bengali

 Bengali Valentines Day Sms| Valentines Day Messages in Bengali | Valentines Day Qotes Bengali|

 

Monta amar manena amar valentine
keno ashe na. Koto valentine ashe jay
otcho tar kono khobor nay.
Chule je amar pakhon doreche hay!
Valentine tomar opekkhaye sudhu tomar
Happy Valentines Day

महाशिवरात्रि की व्रत-कथा Maha Shiv Ratri Katha in Marathi,Hindi

 Maha Shiv Ratri Katha in Marathi,Hindi  महाशिवरात्रि की व्रत-कथा

Maha shivratri on 27 Feb 2014  

Mahashiv ratri Katha

 


एक बार पार्वती ने भगवान शिवशंकर से पूछा, ‘ऐसा कौन सा श्रेष्ठ तथा सरल व्रत-पूजन है, जिससे मृत्यु लोक के प्राणी आपकी कृपा सहज ही प्राप्त कर लेते हैं?’

उत्तर में शिवजी ने पार्वती को ‘शिवरात्रि’ के व्रत का विधान बताकर यह कथा सुनाई- ‘एक गाँव में एक शिकारी रहता था। पशुओं की हत्या करके वह अपने कुटुम्ब को पालता था। वह एक साहूकार का ऋणी था, लेकिन उसका ऋण समय पर न चुका सका। क्रोधवश साहूकार ने शिकारी को शिवमठ में बंदी बना लिया। संयोग से उस दिन शिवरात्रि थी।

शिकारी ध्यानमग्न होकर शिव संबंधी धार्मिक बातें सुनता रहा। चतुर्दशी को उसने शिवरात्रि की कथा भी सुनी। संध्या होते ही साहूकार ने उसे अपने पास बुलाया और ऋण चुकाने के विषय में बात की। शिकारी अगले दिन सारा ऋण लौटा देने का वचन देकर बंधन से छूट गया।

अपनी दिनचर्या की भाँति वह जंगल में शिकार के लिए निकला, लेकिन दिनभर बंदीगृह में रहने के कारण भूख-प्यास से व्याकुल था। शिकार करने के लिए वह एक तालाब के किनारे बेल वृक्ष पर पड़ाव बनाने लगा। बेल-वृक्ष के नीचे शिवलिंग था जो बिल्वपत्रों से ढँका हुआ था। शिकारी को उसका पता न चला।

पड़ाव बनाते समय उसने जो टहनियाँ तोड़ीं, वे संयोग से शिवलिंग पर गिरीं। इस प्रकार दिनभर भूखे-प्यासे शिकारी का व्रत भी हो गया और शिवलिंग पर बेलपत्र भी चढ़ गए।

एक पहर रात्रि बीत जाने पर एक गर्भिणी मृगी तालाब पर पानी पीने पहुँची। शिकारी ने धनुष पर तीर चढ़ाकर ज्यों ही प्रत्यंचा खींची, मृगी बोली, ‘मैं गर्भिणी हूँ। शीघ्र ही प्रसव करूँगी। तुम एक साथ दो जीवों की हत्या करोगे, जो ठीक नहीं है। मैं अपने बच्चे को जन्म देकर शीघ्र ही तुम्हारे सामने प्रस्तुत हो जाऊँगी, तब तुम मुझे मार लेना।’ शिकारी ने प्रत्यंचा ढीली कर दी और मृगी झाड़ियों में लुप्त हो गई।

कुछ ही देर बाद एक और मृगी उधर से निकली। शिकारी की प्रसन्नता का ठिकाना न रहा। समीप आने पर उसने धनुष पर बाण चढ़ाया। तब उसे देख मृगी ने विनम्रतापूर्वक निवेदन किया, ‘हे पारधी ! मैं थोड़ी देर पहले ही ऋतु से निवृत्त हुई हूँ। कामातुर विरहिणी हूँ। अपने प्रिय की खोज में भटक रही हूँ। मैं अपने पति से मिलकर शीघ्र ही तुम्हारे पास आ जाऊँगी।’

शिकारी ने उसे भी जाने दिया। दो बार शिकार को खोकर उसका माथा ठनका। वह चिंता में पड़ गया। रात्रि का आखिरी पहर बीत रहा था। तभी एक अन्य मृगी अपने बच्चों के साथ उधर से निकली शिकारी के लिए यह स्वर्णिम अवसर था। उसने धनुष पर तीर चढ़ाने में देर न लगाई, वह तीर छोड़ने ही वाला था कि मृगी बोली, ‘हे पारधी! मैं इन बच्चों को पिता के हवाले करके लौट आऊँगी। इस समय मुझे मत मार।’

शिकारी हँसा और बोला, ‘सामने आए शिकार को छोड़ दूँ, मैं ऐसा मूर्ख नहीं। इससे पहले मैं दो बार अपना शिकार खो चुका हूँ। मेरे बच्चे भूख-प्यास से तड़प रहे होंगे।’

उत्तर में मृगी ने फिर कहा, ‘जैसे तुम्हें अपने बच्चों की ममता सता रही है, ठीक वैसे ही मुझे भी, इसलिए सिर्फ बच्चों के नाम पर मैं थोड़ी देर के लिए जीवनदान माँग रही हूँ। हे पारधी! मेरा विश्वास कर मैं इन्हें इनके पिता के पास छोड़कर तुरंत लौटने की प्रतिज्ञा करती हूँ।’

मृगी का दीन स्वर सुनकर शिकारी को उस पर दया आ गई। उसने उस मृगी को भी जाने दिया। शिकार के आभाव में बेलवृक्ष पर बैठा शिकारी बेलपत्र तोड़-तोड़कर नीचे फेंकता जा रहा था। पौ फटने को हुई तो एक हष्ट-पुष्ट मृग उसी रास्ते पर आया। शिकारी ने सोच लिया कि इसका शिकार वह अवश्व करेगा।

शिकारी की तनी प्रत्यंचा देखकर मृग विनीत स्वर में बोला,’ हे पारधी भाई! यदि तुमने मुझसे पूर्व आने वाली तीन मृगियों तथा छोटे-छोटे बच्चों को मार डाला है तो मुझे भी मारने में विलंब न करो, ताकि उनके वियोग में मुझे एक क्षण भी दुःख न सहना पड़े। मैं उन मृगियों का पति हूँ। यदि तुमने उन्हें जीवनदान दिया है तो मुझे भी कुछ क्षण जीवनदान देने की कृपा करो। मैं उनसे मिलकर तुम्हारे सामने उपस्थित हो जाऊँगा।’

मृग की बात सुनते ही शिकारी के सामने पूरी रात का घटना-चक्र घूम गया। उसने सारी कथा मृग को सुना दी। तब मृग ने कहा, ‘मेरी तीनों पत्नियाँ जिस प्रकार प्रतिज्ञाबद्ध होकर गई हैं, मेरी मृत्यु से अपने धर्म का पालन नहीं कर पाएँगी। अतः जैसे तुमने उन्हें विश्वासपात्र मानकर छोड़ा है, वैसे ही मुझे भी जाने दो। मैं उन सबके साथ तुम्हारे सामने शीघ्र ही उपस्थित होता हूँ।’

उपवास, रात्रि जागरण तथा शिवलिंग पर बेलपत्र चढ़ाने से शिकारी का हिंसक हृदय निर्मल हो गया था। उसमें भगवद् शक्ति का वास हो गया था। धनुष तथा बाण उसके हाथ से सहज ही छूट गए। भगवान शिव की अनुकम्पा से उसका हिंसक हृदय कारुणिक भावों से भर गया। वह अपने अतीत के कर्मों को याद करके पश्चाताप की ज्वाला में जलने लगा।

थोड़ी ही देर बाद मृग सपरिवार शिकारी के समक्ष उपस्थित हो गया, ताकि वह उनका शिकार कर सके, किंतु जंगली पशुओं की ऐसी सत्यता, सात्विकता एवं सामूहिक प्रेमभावना देखकर शिकारी को बड़ी ग्लानि हुई। उसके नेत्रों से आँसुओं की झड़ी लग गई। उस मृग परिवार को न मारकर शिकारी ने अपने कठोर हृदय को जीव हिंसा से हटा सदा के लिए कोमल एवं दयालु बना लिया।

देव लोक से समस्त देव समाज भी इस घटना को देख रहा था। घटना की परिणति होते ही देवी-देवताओं ने पुष्प वर्षा की। तब शिकारी तथा मृग परिवार मोक्ष को प्राप्त हुए।’

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !! (Marathi Bodha katha)

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !! (Marathi Bodh katha)

Marathi Moral Stories|Moral Stories in Marathi|



"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"

(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.



पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"

परीस ( पारस ) Marathi Bodh Kattha

 परीस ( पारस )  Marathi Bodh Kattha

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......

Marathi Bodh Katha

 Marathi Bodh Katha

Latest New Marathi Bodh Katha 2014| Bodh Katha in Marathi|

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .
__._,_.___
एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .
__._,_.___

Happy Valentine Day Sms 2014

 Happy Valentine Day Sms 2014

2014 Valentine Day Sms| Valentine Day Wishes Sms 2014|



Love smsSweeter than the candies
Lovelier than the Red Roses
More hug-gable than toys
That’s what you’re
Here’s wishing you a Rose Day
That’s as special as you are
Happy Rose Day 2013