Search More Kavita, Katha, Charolya..

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! (Makar Sankranti Greetings)


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! (Makar Sankranti Greetings)


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

व्हॅलेंटाईन गॉड कविता (मराठी कविता (Marathi Kavita))

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन ॥ ध्रू ॥
घेती तुझे नाम आज १४-फे
पाठविती एकमेका किती लिफाफे
लिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी'
'तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन......
आला, आला, आला तो सुदिन

आजच्या दिनी खरेदी प्रचंड
आई-बापांना नसता भूर्दंड
विसरले सारे या देशीचे संत
तू परदेशी पण तूच पसंत

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन...!

नकळत कहितरि घडावे...........! (मराठी कविता (Marathi Kavita))

हुल्लड बालपन खेळातच रमाव
परिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव
सदा मनि एकच विचार.....वाटते....
अदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.

अभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ
रोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ
कसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

मग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर
वहि बोटावरुन फिरवताना मुलिकडे बघाव रोज
तिच्या होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग
नैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात
सार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.

पदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा
सततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा
काय शिकलो? किति शिकलो? याच गणित तेव्हा कराव
वेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव
अन चाहुल लागावि मनि दुखि होउनि
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.

दिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत
जबाबदारिच ओझ जड होतच राहत
नकळ्त पानावतात डोळे तिचा चेहरा उभा राह्तो
कुठे असेल ति मन भुतकाळात डोकाउ लागत
एक अत्रुप्त इछ्या तिच्या सोबत जगन्याचि
गुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात
क्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

बापाच नात मग जपाव लागत
त्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात
आपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा
असेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला
सार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक
अन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.

मग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर
नजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब
हाति येते काठि तोच एकमेव आधार
सार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ
उशाकाल होइल का?.....चक्र असे हे नशिबाचे
तरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते
नकळत कहितरि घडावे...........!
नकळत कहितरि घडावे ..........!

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

संपला उचला लवकरी!
लक्ष होतं त्याचे मजवरी !!
एकदा आली पाळी मजघरी!
म्हणती उचल रे झडकरी !!


मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

पाहत होतो प्रेमाचा रंग 
त्यात झाली होती रे दंग !!
निघाला वीर विवेकानंद !
बघुनी बाय पडली थंड ! 

गुलाब पुष्प (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories)),

गुलाब पुष्प 
एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला. त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, " दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील." हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, "जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल." या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  " हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला, " महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं." राजा त्याच्या होशारीवर खुश झाला.

तात्पर्य : -   सारासार विचार करून निर्णय घेतल्यास तो योग्य ठरतो.


उद्योगी माकड ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories)),

  उद्योगी माकड 
 एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली. तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत. मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे. त्यातील काही माकडे फार उद्योगी होती.  ती रोज सुताराना काम करताना पाहात असत. एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला जवळच्या नदी काठावर गेले. सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली. त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तेथे गेली; आणि सुतारांची हत्यार उस्तरू लागली. एक भले मोठे झाडाचे खोड तिथे पडले होते. सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते. जेवण झाल्यावर ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता.  एका माकडाने ते पाहिले. ते त्या खोडावर जाऊन बसले; आणि सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचविले. परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली. त्याबरोबर लाकडाची ती फट बंद झाली. त्यात त्या माकडाची शेपटी अडकली. शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते ओरडू लागले.

तात्पर्य : - 
                 वेडपट उद्योगाची किंमत माकडाला मोजावी लागली.


 

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

पूर्वीचा गणेशोत्सव
होई मोठे प्रबोधन
रोषणाई झगमगाट
आता फक्त खर्च धन !!

मराठी चारोळ्या (Marathi Charolya),

भ्रष्टाचार, महागाई 
समस्यांचे पर्यावरण 
श्री गणेशाचे आगमन 
संकटाचे निवारण!!


भाव वाढीचा भासे 
परिणाम मोठा
 नैवेद्याच्या ताटात 
मोदक असे छोटा !!


 


गांधी टोपी (मराठी कविता (Marathi Kavita)),

गांधी टोपी 
 फिरुनि आज उजळेल गांधी
अण्णाच्या आंदोलनातुनी 
 देशभर भरली टोपी गांधी

  गांधी  टोपीवरती बसले अण्णा
म्हणती भ्रष्टाचार चौफेरुनी हाणा
एवढीच आहे आता एकच नामी संधी

 गेले गांधी  उलटली वर्षे साठ
भ्रष्टाचारी भस्मासुर झाला ताठ
 अण्णा म्हणती, तयासी ठेचणार कधी 

कायदा आला, त्याला धाब्यावर बसविला 
 धाब्यावर बसतो तो कायदा कसला 
 आपणच व्हा सुसंस्कारित, सांगे टोपी गांधी




मराठी सुविचार (Marathi Thoughts),

    १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
    २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
    ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
    ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
    ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
    ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
    ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
    ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
    ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
    १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
    ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
    १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
    १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
    १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
    १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
    १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
    १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
    १८) आधी विचार करा; मग कृती करा.
    १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
    २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
    २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
    २२) अतिथी देवो भव ॥
    २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
    २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
    २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी ! ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

 गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी


पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

         अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ  गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले.

         मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'

पाणी गढूळ करणारा कोळी (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

   पाणी  गढूळ करणारा कोळी.

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

मराठी म्हणी (Marathi Mahni),

अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.

अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.

अपयश हे मरणाहून वोखटे.

अपापाचा माल गपापा.

अपुऱ्या घड्याला डबडब फार.

अप्पा मारी गप्पा.

अर्धा वैद्या मरणास खाद्य.

अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.

अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

अल्प बुध्दी, बहु गर्वी.

अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.

अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

अळी मिळी गुपचिळी.

अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.

अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.

असतील चाळ तर फिटतील काळ.

असतील मुली तर पेटतील चुली.

असतील शिते तर जमतील भूते.

असून अडचण नसून खोळांबा.

असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.

असेल दाम तर हो‌ईल काम.

असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

मराठी सुविचार (Marathi Thoughts)

    सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  
   "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.
  
    आधी विचार करा, मग कृती करा.
  
    स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

    कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते

    आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

    शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

    निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

    ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर

    जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो

    मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

    आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

    एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

    तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

    सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

    सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

मराठी म्हणी (Marathi Mahni)

म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा.
याची देहा, याची डोळा.
याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
रंग गोरापान आणि घरात गु घान.
रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
राईचा पर्वत.
राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
राजा तशी प्रजा.
राजा बोले अऩ दल चाले.
राजाला दिवाळी काय ठाऊक?
रात्र थोडी अऩ सोंग फार.
रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
रोज मरे त्याला कोण रडे.
लंकेत सोन्याच्या विटा.
लकडी शिवाय मकडी वळत नाही.
लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
लहान तोंडी मोठा घास.
लांड्यामागे पुंडा.
लाखाचे बारा हजार.
लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
लेकी बोले सुने लागे.
लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
वड्याचे तेल वांग्यावर.
वर झगझग आत भगभग.
वर मुकुट आणि खाली नागडं.
वराती मागून घोडे.
वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
वरून कीर्तन आतून तमाशा.
वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
वळवाचा पाऊस.
वळू ऊठला पण संशय फिटला.
वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
वाचेल तो वाचेल.
वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
वाटाण्याच्या अक्षता.
वासरात लंगडी गाय शहाणी.
वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
विषाची परीक्षा.
विहीणाचा पापड वाकडा.
वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.


मराठी विनोद (Marathi Jokes)

गंपू घरी बायकोचा फोटो समोर ठेवून त्याच्यावर चाकू मारत असतो. पण प्रत्येक वेळी त्याचा नेम चुकत असतो. तेवढ्यात बायकोचा फोन येतो. ती विचारते, 'काय क

रतोयस?' गंपू उत्तरतो, 'तुला मिस् करतोय!'

मराठी विनोद (Marathi Jokes)

संता आणि त्याची बायको आफ्रिकेच्या जंगलात फिरत होते. तितक्यात एक बिबळ्या त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला.

संताची बायको : ओ जी...वाघ आपल्या समोर आहे. लवकर शूट करा.

संता : अगं थांब जरा दोन मिनिटं...कॅमेऱ्याची बॅटरी बदलतो आणि मग शूट करतो.

गरुड आणि घुबड (मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

 गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'

पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'

    तात्पर्य:-
                                  स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.

मराठी विनोद (Marathi Jokes)


पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!

मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

पाहुणे : अरे वा, तुमच्याकडे पुस्तकांचं चांगलं कलेक्शन आहे! आता त्याच्यासाठी एक चांगलंसं कपाट पण घ्या!


यजमान : अहो कपाट कोणी उसनं देत नाही!

मराठी विनोद (Marathi Jokes)


वेटर : तुम्ही हॉटेलचे दोन चमचे खिशात टाकलेत!


गिऱ्हाइक : मला डॉक्टरांनीच सांगितलंय- जेवल्यावर दोन चमचे घेत जा!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं!


खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो.


शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का?


गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!!

मराठी विनोद (Marathi Jokes)

शिक्षक : हाजीअली कुठे आहे?


गंपू : वरळीला!


शिक्षक : प्रभादेवी कुठे आहे?


गंपू : कालच साताऱ्याला गेली!

मराठी उखाणे(Marathi Ukhane)

जीवनाच्या रंगमंचावर सुरु झाली एकांकिका _________________ रावांचे नाव घेते सर्वजणी ऐका.

सप्तपदीची सात पावले साताजन्माची ठरावी _________________ बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

तारकांचे नुपूर बांधून नृत्य करते उषा ___________ रावांचे नाव घेते _______________ ची स्नुषा .

 काश्मीरच्या नंदनवनात सर्वाना होतो स्वर्गसुखाचा भास _______________ रावांचे  नाव घेते तुमच्याकरिता खास.

 हाव नसावी पैशाची, गर्व नसावा रूपाचा ________________ रावांना घास देते साखरभाताचा.

 वसंत ऋतूत कोकिला आनंदाने गातात. __________________ रावांचे  सोबत दिवस आनंदात जातात. 









लबाड बोका ( मराठी बोधकथा (Marathi Moral Stories))

लबाड बोका 

एका जंगलात   एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली.  बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले.  एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही.  आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे उशीरा त्याच्या लक्षात आले.


तात्पर्य :- दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ.

स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे ( मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे
उरले नाही मोल 
चंगळवादी लाटेत या गोष्टी  
ठरती फारच फोल !!

देशा पुढच्या समस्यांना (मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

देशा पुढच्या समस्यांना 
आहे एकाच तंत्र
देशभक्ती, देशाभिमान
जगविणे हाच तो मंत्र !!





कळत नाही कस काढावं (मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

  कळत नाही कस काढावं
आता त्याच्या वायाच माप 
सत्तरीत असून म्हणतो 
' बुढा होगा तेरा बाप '

लाल दिव्याच्या गाडीची (मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

लाल दिव्याच्या गाडीची 
होती त्याला अभिलाषा 
म्हणून मुख्यमंत्र्याचा तो 
सदा बडवीत असे ताशा


सुनामीच्या संकटान (मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

सुनामीच्या संकटान
जपान काही खचल नाही
 आपटी निवारणाच ज्ञान
 आम्हाला मात्र पचल नाही .











अगरबत्ती ( मराठी कविता (Marathi Kavita))

अगरबत्ती
तुझी साथ कशी सोडू 
जीवनाच्या वळणावर 
तुझ्यातल्या वलयाच्या
आधारान झेपावणारे 
 माझे हात कसे सोडू
 एकटीनच जळताना कसा 
सहन करतेस प्रवास 
आदर्श घ्यावा तुझा 
असा असू दे ध्यास 
दुसऱ्याच्या सुगंधासाठी 
स्वतः चा वनवास 
साधारण, सुमार रंग 
अंगकाठी तुरीसारखी ढंग 
रूपाचा बघतच राहावा बेरंग 
 जळताना आणते झिंग 
आयुष सरत येत तेव्हा 
गतकाळाच भान नसत 
वर्तमान नसतो विषण्ण
 परमेश्वरालाही करतेस प्रसन
 तुझ संपण खिन्न खिन्न
मन होत सुन्न 
 तुझा देह छिन्न 
उरतो फक्त सुवास.

 

मराठी उखाणे(Marathi Ukhane)

  माझ्या कल्पकतेने देईल मी माझ्या संसारी जीवनाला आकार _______________ रावांनी द्यावा मला व्यक्तिगत जीवन जगण्याचा अधिकार.

  चांगला पती मिळावा म्हणून देवाला जोडले नाही कर, माझ्यात काही कर्तृत्व होतं म्हणून मिळाला मला ___________ रावांसारखा वर.

     प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर मिळत सौभाग्याच दान ______________ रावांनी पण माणूस म्हणून जगण्याच द्यावं मला स्थान.

 माझ्या मनाच्या शिंपल्यात प्रीतीचे मोती _______________ रावामुळे जुळली संसाराची नाती.

  स्त्रीच खर सौंदर्य म्हणजे तिचे शील व सौजन्यता ______________ रावसोबत आले मी माझ्या सौभाग्याच्या मंदिरात.






मराठी उखाणे(Marathi Ukhane)

 पौर्णिमेच्या रात्री गगन दिसे चंदेरी चंदेरी________________ रावांच्या पाठोपाठ आले सौभाग्याच्या मंदिरी !

मेघांच्या वर्षावाने वसुंधरा झाली ओलीचिंब, माझ्या हृदयात____________ रावांचे प्रतिबिंब.

 हुंडा घेणे अन देणे हा आहे गुन्हा ______________ रावांच नाव एकदा घेतलं आता विचारू नका पुन्हा पुन्हा.


 माझ्या मनाच्या बगिच्यात फुलला प्रीतीचा वसंत _______________ रावांनी एवढ्या मुली पहिल्यात पण मला केले पसंत. 

 प्रीतीची फुलं मिळत नाही बाजारात ____________ रावासोबत भांडल्याशिवाय मजाच येत नाही संसारात.






मराठी विनोद (Marathi Jokes)

चिनी कुत्र्याचे नाव काय ?
>हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
>हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
>उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
>कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात


अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
>वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
>ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
>माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
>थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
>धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
>घड्याळ दुरुस्त करण्याची !

दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
>कारण दुसरी चिमणी Factory ची असते.

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
>कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
>कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
>रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..

पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
>दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!

संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
>संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''

पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
>मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.

नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
>कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.


Funny Marathi Ukhane (मराठी उखाणे(Marathi Ukhane))


आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!

अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!

***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर






मराठी म्हणी (Marathi Mahni)

    म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
    म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
    म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
    या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा.
    याची देहा, याची डोळा.
    याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
    येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
    येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
    येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
    रंग गोरापान आणि घरात गु घान.
    रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
    रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
    रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
    राईचा पर्वत.
    राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
    राजा तशी प्रजा.
    राजा बोले अऩ दल चाले.
    राजाला दिवाळी काय ठाऊक?
    रात्र थोडी अऩ सोंग फार.
    रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
    रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
    रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
    रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
    रोज मरे त्याला कोण रडे.
    लंकेत सोन्याच्या विटा.
    लकडी शिवाय मकडी वळत नाही.
    लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
    लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
    लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
    लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
    लहान तोंडी मोठा घास.
    लांड्यामागे पुंडा.
    लाखाचे बारा हजार.
    लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
    लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
    लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
    लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
    लेकी बोले सुने लागे.
    लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
    लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
    लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
    वड्याचे तेल वांग्यावर.
    वर झगझग आत भगभग.
    वर मुकुट आणि खाली नागडं.
    वराती मागून घोडे.
    वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
    वरून कीर्तन आतून तमाशा.
    वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
    वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
    वळवाचा पाऊस.
    वळू ऊठला पण संशय फिटला.
    वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
    वाचेल तो वाचेल.
    वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
    वाटाण्याच्या अक्षता.
    वासरात लंगडी गाय शहाणी.
    वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
    विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
    विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
    विषाची परीक्षा.
    विहीणाचा पापड वाकडा.
    वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
    वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
    वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
    वैरी गेला अन जागा पैस झाला.
    शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
    शहाणं होईना अन सांगता येईना.
    शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
    शहाण्याला शब्दाचा मार.
    शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
    शितावरून भाताची परीक्षा.
    शिर सलामत तर पगड़ी पचास.
    शिराळ शेती दाट.
    शिळ्या कढीला ऊत.
    शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
    शेरास सव्वाशेर.
    शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?
    शोधा म्हणजे सापडेल.
    'श्री' आला की 'ग' सुध्दा येतो.
    श्रीमंता घरच्या कुत्र्याला पण 'आहो हाडा' म्हणावे लागते.
    संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
    सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
    सगळं मुसळ केरात.
    सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
    सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
    अंधारात केले पण उजेडात आले.
    अंधेर नगरी चौपट राजा.
    अकिती आणि सणाची निचिती.
    अक्कल खाती जमा.
    अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
    अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
    अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
    अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
    अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
    अघळ पघळ अन घाल गोंधळ.
    अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
    अडला हरी गाढवाचे पाय धरी.
    अडली गाय खाते काय.
    अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
    अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
    अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
    अढीच्या दिढी सावकाराची सढी.
    अती केला अनं मसनात गेला.
    अती झालं अऩ हसू आलं.
    अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
    अती तिथं माती.
    अती परीचयात आवज्ञा.
    अती राग भीक माग.
    अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
    अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
    अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
    अपयश हे मरणाहून वोखटे.
    अपापाचा माल गपापा.
    अपुऱ्या घड्याला डबडब फार.
    अप्पा मारी गप्पा.
    अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
    अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
    अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
    अल्प बुध्दी, बहु गर्वी.
    अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
    अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
    अळी मिळी गुपचिळी.
    अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
    अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
    असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
    असतील चाळ तर फिटतील काळ.
    असतील मुली तर पेटतील चुली.
    असतील शिते तर जमतील भूते.
    असून अडचण नसून खोळांबा.
    असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
    असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
    असेल दाम तर होईल काम.
    असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
    आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
    आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
    आंधळीपेक्षा तिरळी बरी.
    आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
    आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
    आईचा काळ, बायकोचा मवाळ.
    आईची माया अन पोर जाईला वाया.
    आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
    आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
    आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
    आग लागल्यावर विहीर खणणे.
    आगीशिवाय धूर दिसत नाही.
    आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
    आज अंबारी, उद्या झोळी धरी.
    आजा मेला, नातू झाला.
    आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
    आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
    आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
    आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
    आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
    आधणातले रडतात, सुपातले हसतात.
    आधी करा मग भरा.
    आधी करावे मग सांगावे.
    आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
    आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
    आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
    आधी नमस्कार मग चमत्कार.
    आधी पोटोबा, मग विठोबा.
    आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
    आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
    आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
    आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
    आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
    आपण आपल्याच सावलीला भितो.
    आपण आरे म्हटले की कारे आलेच.
    आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
    आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
    आपण सुखी तर जग सुखी.
    आपलंच घर, हागुन भर.
    आपला आळी, कुत्रा बाळी.
    आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
    आपला हात, जग्गन्नाथ.
    आपलाच बोल, आपलाच ढोल.
    आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
    आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
    आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
    आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
    आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
    आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
    आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
    आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
    आपल्या कानी सात बाळ्या.
    आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
    आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
    आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
    आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
    आय नाय त्याला काय नाय.
    आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
    आयत्या बिळात नागोबा.
    आराम हराम आहे.
    आरोग्य हीच धनसंपत्ती.
    आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
    आला भेटीला धरला वेठीला.
    आली अंगावर, घेतली शिंगावर.
    आली चाळीशी, करा एकादशी.
    आली सर तर गंगेत भर.
    आलीया भोगासी असावे सादर.
    आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
    आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
    आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
    आळश्याला दुप्पट काम.
    आळी ना वळी सोनाराची आळी.
    आळ्श्याला गंगा दूर.
    आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
    आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
    आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
    आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
    आशा सुटेना अन देव भेटेना.
    आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
    इकडून तिकडून सगळे सारखे.
    इकडे आड़ तिकडे विहीर.
    इच्छा तसे फळ.
    इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
    इजा बिजा तीजा.
    ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
    ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
    उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी येऊ काय?
    उंटावरचा शहाणा.
    उंदराला मांजराची साक्ष.
    उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
    उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
    उचलली जीभ लावली टाळ्याला.
    उठता लाथ, बसता बुक्की.
    उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
    उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
    उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
    उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
    उथळ पाण्याला खळखळाट फार.
    उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
    उधार तेल खवट.
    उधार पाधार वाण्याचा आधार.
    उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
    उन पाण्याचे घर जळत नसते.
    उपट सुळ, घे खांद्यावर.
    उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
    उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
    उसना पसारा देवाचा आसरा.
    उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
    उसाच्या पोटी कापूस.
    ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
    ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
    एक कोल्हा सतरा ठिकाणी प्याला.
    एक गांव बारा भानगडी.
    एक गोरी आणि हजार खोड्या चोरी.
    एक घाव दोन तुकडे.
    एक तीळ सात जणांनी वाटून खावा.
    एक ना धड बाराभर चिंद्या.



नकळत कहितरि घडावे...........! ( मराठी कविता (Marathi Kavita))

हुल्लड बालपन खेळातच रमाव
परिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव
सदा मनि एकच विचार.....वाटते....
अदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.

अभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ
रोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ
कसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

मग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर
वहि बोटावरुन फिरवताना मुलिकडे बघाव रोज
तिच्या होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग
नैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात
सार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.

पदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा
सततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा
काय शिकलो? किति शिकलो? याच गणित तेव्हा कराव
वेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव
अन चाहुल लागावि मनि दुखि होउनि
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.

दिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत
जबाबदारिच ओझ जड होतच राहत
नकळ्त पानावतात डोळे तिचा चेहरा उभा राह्तो
कुठे असेल ति मन भुतकाळात डोकाउ लागत
एक अत्रुप्त इछ्या तिच्या सोबत जगन्याचि
गुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात
क्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

बापाच नात मग जपाव लागत
त्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात
आपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा
असेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला
सार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक
अन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.

मग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर
नजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब
हाति येते काठि तोच एकमेव आधार
सार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ
उशाकाल होइल का?.....चक्र असे हे नशिबाचे
तरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते
नकळत कहितरि घडावे...........!
नकळत कहितरि घडावे ..........!

"तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार (मराठी सुविचार (Marathi Thoughts))

आधी विचार करा, मग कृती करा.

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

मराठी म्हणी (Marathi Mahni)

    डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते.
    डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.
    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.
    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.
    ढोंग धतोरा, हाती कटोरा.
    ढोरात ढोर, पोरात पोर.
    त वरून ताकभात.
    तण खाई धन.
    तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
    तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
    तळहाताने चंद्र झाकत नाही.
    तळे राखी तो पाणी चाखी.
    तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
    तहान लागल्यावर आड खणणे.
    ताकापुरते रामायण.
    ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
    तागास तूर लागू न देणे.
    ताटाखालचं मांजर.
    ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
    तारेवरची कसरत.
    तीन तिघडा काम बिघाडा.
    तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
    तुकाराम बुवांची मेख.
    तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
    तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
    तुरात दान, महापुण्य.
    तुला नं मला, घाल कुत्र्याला.
    तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
    तेरड्याचे रंग तीन दिवस.
    तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
    तेलणीवर रुसली अंधारात बसली.
    तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
    तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
    तोंडात तीळ भिजत नाही.
    तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
    त्यात काही राम नाही.
    थांबला तो संपला.
    थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
    थेंबे थेंबे तळे साचे.
    थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.
    थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
    थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
    दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
    दगडापेक्षा विट मऊ.
    दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
    दहा गेले पाच उरले.
    दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
    दही वाळत घालून भांडण.
    दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
    दांत कोरून पोट भरतो.
    दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
    दानवाच्या घरी रावण देव.
    दाम करी काम.
    दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
    दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
    दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
    दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
    दिवस बुडाला मजूर उडाला.
    दिवसा चुल रात्री मूल.
    दिवाळी दसरा हात पाय पसरा.
    दिव्याखाली नेहमीच अंधार.
    दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
    दुःख रेड्याला न डाग पखालीला.
    दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
    दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.
    दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
    दुभत्या गाईच्या लाथा गोड.
    दुरून डोंगर साजरे.
    दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
    दुष्काळात तेरावा महिना.
    दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
    दृष्टी आड सृष्टी.
    दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
    दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
    दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.)
    देखल्या देवा दंडवत.
    देण कुसळाच, करणं मुसळाच.
    देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
    देणाऱ्याचे हात हजार.
    देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
    देणे ना घेणे रिकामे गाणे.
    देव तारी त्याला कोण मारी.
    देव भावाचा भुकेला.
    देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
    देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
    देवाची करणी आणि नारळात पाणी.
    देश तसा वेश.
    देह देवळात चित्त पायतणात.
    दैव देतं अऩ कर्म नेतं.
    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
    दोघींचा दादला उपाशी.
    दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
    दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
    द्या दान सुटे गिरान (ग्रहण).
    धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
    धनवंताला दंडवत.
    धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)
    धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.
    धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
    धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
    धाक ना दरारा, फुटका नगारा.
    धावत्यापाठी यश.
    धावल्याने धन मिळत नाही.
    धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.)
    धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.
    धुतल्या तांदळातला खडा.
    न कर्त्याचा वार शनिवार.
    न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
    न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
    नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
    नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
    नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
    नमनाला घडाभर तेल.
    नरो वा कुंजारोवा.
    नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
    नवरा नाही घरी सासरा जांच करी.
    नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.
    नव्याची नवलाई.
    नव्याचे नऊ दिवस.
    नसुन खोळंबा असुन दाटी.
    ना घरचा ना घाटचा.
    नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
    नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
    नांव गंगुबाई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबाई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाही).
    नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
    नांव मोठे लक्षण खोटे.
    नांव सगुणी करणी अवगुणी.
    नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
    नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
    नाक दाबले की तोंड उघडते.
    नाकपेक्षा मोती जड.
    नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा
    नाकावर पदर अन विशीवर नजर.
    नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
    नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌


"तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार" मराठी सुविचार (Marathi Thoughts)

1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

2) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.

6) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

7) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

8) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे

9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.

10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष
वेधतो.


स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, मराठी चारोळ्या (Marathi Charolya)

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...


मराठी विनोद (Marathi Jokes)

ptI : Daila-ga ha Gao jyausa. p%naI : maaobaa[la faonacaaÆ ptI : hao Aa^roMjacaa Aaho naaÑ

मराठी विनोद (Marathi Jokes)


PaZnaovaalaa gaQaa ha iBaMtIvarcaa saMdoSa vaacaUna sardarjaI puZlyaa iBaMtIvar ilaihtao ilaKnaovaalaa gaQaa Ñ  caar sardaraMnaI caosa KoLayacaM zrvalaM. PaNa caosabaaoD- ekca haota. tovha %yaatlaa ek mhNaalaa naao p`a^blaoma AapNa Dblasa KoLUÑ    
    

सुविचार

1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

5) मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
8) आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित
करु शकतो.

9) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.
10) थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
12) दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व
साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
13) दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

आधुनिक मराठी म्हणी... (Marathi Mahni)

Programmer's aid
. एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे ·
आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती

· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही

· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं

Read more: http://memarathi.blogspot.com/2010/06/blog-post_18.html#ixzz1VLWnhzLu

तुझ्या - माझ्या प्रेमाच्या चारोळ्या ! (Marathi Charolya)

तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!

मराठी विनोद (Marathi Jokes)


1) पु.लंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

2) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"


उन्हाळ्यातली झाडे - २ : पिंपळ (Marathi Kavita)




नुकतेच मुंडण केलेल्या
बटूच्या
डोक्याप्रमाणे
गोमटेपणा मिरवणार्‍या
पिंपळाने
केली सुरू तपश्चर्या ...
सूर्याचे पुढे ठाकलेले
आव्हान झेलण्यासाठी ...

तेव्हा झाली कृपा
त्यावर
पृथ्वी आणि जळाची !

दिसू लागली प्रभावळ
त्याच्या भोवती पालवीची !

पालवी ...
भूमीच्या रंगाची,
पाण्यासारखी तजेलदार !

अद्वैताचा झालेला हा स्पर्श
जेव्हा सांभाळू लागेल जीवन-तत्व,
हिरव्या पर्णसंभारातून ..
तेव्हा
सूर्याचे असंख्य असह्य किरण
शोषून घेत हा पिंपळ

होत राहील उतराई
भूमी आणि जळाप्रत
त्यासाठी,
त्यांनी केलेल्या कृपेतूनच
देत राहील
गारवा आणि आसरा
रणरणत्या उन्हाच्या
वैराणातही !

आणि मग करील आवाहन
मेघांना ..
अधिक सामर्थ्याने
या दाहकतेवर
जलतत्वाचे अखंड वर्षाव
घडवण्यासाठी !

जीव-सृष्टीच्या
कल्याणाचा एक आश्रम
अविरत चालवणारा
योद्धा ऋषी ...
हा पिंपळ !

गोळा बेरीज (Marathi Kavita)

माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक

लग्नातली देणी-घेणी (Marathi Moral Stories)

लग्नातली देणी-घेणी

उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'
ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'
राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'
राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'
गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

चातुर्य कथा (Marathi moral stories)

चातुर्य कथा

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥

- समर्थ रामदास

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.
माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,

भावार्थ - विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.

अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात..
उदंड बाजार मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।।
धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ।।

भावार्थ - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

पाण्याचा पैसा पाण्यात (Marathi Moral stories)

पाण्याचा पैसा पाण्यात 

     एका खेडेगावात एक दूधवाला रहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळविला होता. त्याच्या जवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दुध काढून ते तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिऱ्हाइकपर्यंत पोहचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे. आणि ते दुध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिऱ्हा इकाकडून  पैश्याची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैश्यातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले . तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दुधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला. " रडू नकोस गिऱ्हा इकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तिच वाहून गेली आहे." 


तात्पर्य : - 
 चांगल्या मार्गाने मिळविलेली संपत्ती टिकते. तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही.

चारोळ्या (Marathi Chrolya)

माझ्यातल मी पण
 जेव्हापासून  जपण सोडलय
माझ्या मनान तुझ्याशी 
तेव्हापासून नात जोडलंय.


फुलुदे फुलते तशी 
तुझी माझी प्रीत 
टोकू दे टोकतात तर 
तीच जगाची रीत 

 माझी एक वाट नवी
तुझ्या घराकडे वळलेली
कितीही नाही म्हटलं तरी 
नकळत जुळलेली.


मराठी उखाणे (Marathi Ukhane)

भारत मातेचे रक्षण करण्यासाठी पाठविले पति
सीमेवर .............. रावांचे नाव घेताच ह्रदय भरून आले काठोकाठ . 

नागपंचमीला नाग डोलतो शिवलिंगावर ............. रावांचे
नाव घेऊन सांगते माझा विश्वास दैवावर.

 श्रावण महिन्यात जिकडे पाहावे तिकडे हिरवे हिरवे  
  गालीचे रावांचे .......... नाव घेऊन दान मागते सौभाग्याचे. 

   पाना फुलांची राखी त्याला रेशमाचा धागा नंद्बाई
  ................ रावाजवळ काहीतरी मागा.

 स्वतंत्र भारताचे प्रतिक आहे तिरंगा मी .......... रावांचे 
 नाव घेतले आता तुम्ही सांगा.











गमतीदार उखाणे (Funny ukhane)

 गमतीदार उखाणे
एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

खोक्यात खोका टिविचा खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

एक होति चिउ एक होता काउ
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ  

 शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रे

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.

टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.

साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली

बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
  • बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो .........बोट नको चाउस 

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

तांदुळ निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत बसले होते दारात

ते पादले दारात नि वास आला घारात

परातित परात चान्दिचि परात,
....राव हागले दारात, जाऊ कशि घरात.       

शिष्याची परीक्षा - गुरु पोर्णिमा (मराठी बोधकथा)


 शिष्याची परीक्षा - गुरु पोर्णिमा

रामानुजाचार्य शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ''माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?''

   रामानुज नम्रपणे म्हणाले, ''गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.'' शठकोपस्वामींनी विचारले, ''हे तुला ठाऊक असतांनासुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?''

   यावर रामानुज म्हणाले, ''वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.''

   ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले.  त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.

   मुलांनो, रामानुजांनी ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगितली. त्यांच्या तळमळीने स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपणही आपल्याला मिळालेले ज्ञान असेच वाटले पाहिजे. 

परीस ( पारस ) - मराठी बोधकथा

परीस ( पारस )

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....


तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......



मराठी उखाणे

 आईनी केले संस्कार,  वडिलांनी केले सक्षम,
सासूसासर्यांचा छायेत ................... च्या मायेत 
 संसाराचा पाया करीन भक्कम !! 


पाहताना मजला आली अवर्ण्या धुंदी 
.......... आले जीवनी,जाहली, फुले सुगंधी. 


कुठे लपला होता कान्हा,
इतके दिवस गवसला नाही,
...........चा आगमनाने,
आता सुखाला कमतरता नाही. 


माहेर तसे सासर, नाते संबंध जुने,
...........आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. 










मराठी चारोळ्या

तुज्या डोळ्यात
अश्रु नसावे कधी
माझे सर्वस्व हरवून
दुःख पुसावे क्षणी .....

माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का?

डोळ्यांची भाषा
डोळ्यांना समजली...
डोळ्यांनीच मग
ती मनात उतरवली..

डोळ्यांची उघडझाप होताच
लुकाछुपी खेळतोस किती
इतका का रे सतवतोस
मज कळेना तुझी हि प्रीती ..

सतावणे तुझे
डोळ्यांत दिसे
हसून मग..
डोळ्यां लाजवे..!!

तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येतामधे
डोळे माझे आपोआप झुकले ..